जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
बंधुभाव, एकता, सहकार्य व राष्ट्रप्रेमाचा दिला संदेश
भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ बहिणीच्या स्नेह व विश्वासाचे प्रतीक असलेल्या “रक्षाबंधन ” सणानिमित्त जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.विद्यालयात अभिनव उपक्रम राबवत शाळेच्या मैदानावर विद्यार्थांच्या संरचनेच्या स्वरूपात भव्य, आकर्षक मानवी राखी साकारण्यात आली.

विद्यार्थांच्या एकजूट, शिस्त व सर्जनशीलतेचे दर्शन घडविणारा हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला. राखीच्या सजावटीमध्ये तिरंगा ध्वज व स्वस्तिक चिन्हाचा वापर केल्याने संपूर्ण विद्यार्थी संरचना अत्यंत देखणी व लक्षवेधी दिसत होती.

या वेळेस विद्यार्थिनींना मध्यभागी बसवून स्वस्तिक चिन्ह साकारण्यात आले होते. मैदानावर राखीच्या रचनेनुसार बसताना विद्यार्थांनी शिस्त, संयम व समन्वयाचे उत्कृष्ट दर्शन घडविले. विद्यार्थांच्या कलागुण, कल्पकता, नेतृत्वगुण, सहकार्य यासारख्या गुणांना वाव मिळावा तसेच सामूहिक कार्यातून एकात्मतेची भावना विकसित व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री.संजय वानखेडे यांच्या संकल्पनेनुसार पर्यवेक्षक सौ. रमा तारे, श्री.जगदीश साळुंखे व शाळेतील शिक्षक श्री.उल्हास ठाकरे, श्री.हिम्मत काळे, श्री.उमेश ढाकणे, श्री.आनंद पाटील, श्री.प्रणित येवले, श्री.जावेद पटेल, श्री.अशोक पाटील, श्री.मयूर पाटील, श्री.दिलीप गायकवाड, श्री.हितेंद्र जोशी, सौ.मंगला भारुळे, श्रीमती संपदा तुंबळे, सौ.वृषाली पाटील, सौ.मनिषा देशमुख, सौ.स्वाती एडके, श्री.किशोर माळी, सौ.अरुणा अडकमोल तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्यं व नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे “मानवी आकर्षक राखीची” रचना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. विद्यार्थांच्या एकजुटीतून साकारलेल्या या मानवी राखीने एकता, बंधुभाव व राष्ट्रप्रेमाचा प्रभावी संदेश दिला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
