मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
घनसावंगी तालुक्यात शासनाकडुन होणारे पंचनामा शासनाच्या निकाशानुसार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये मोठया प्रमाणावर अतिवृष्टी पावसामुळे शेतकन्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. यामध्ये पिकामध्ये मोठया प्रमाणावर पाणी साचल्यामुळे पिके सडलेली आहेत, पावसामुळे गाळ वाहून आल्यामुळे शेतातील विहिरी बुजल्या आहेत, अतीवृष्टीमुळे शेतजमीनीची सुपीक माती खरडुन गेलेली आहे तसेच शेतातील इतर साहित्य, गौधन. इ. पुर्ण पाण्यामध्ये वाहुन गेलेले आहे. याचा शासनकडुन पंचनामा करण्याचे आदेश देण्यात जालेले यानुसार शासन स्तरावर त्यांच्या अधिकाऱ्यांकडुन पंचनामा करण्यात येत आहे. याचसंबंधी शासनकडुन घनसावंगी तालुक्यात विविधी कृषी व महसुल विभागाकडुन पंचनामा करण्यात येत आहे. सदर पंचनामा अधिकारी यांच्याकडुन शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करते वेळी जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत असल्याचे दिसुन येत आहे. यांच्याकडुन शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नुकसान झालेले असतांना देखील पंचनामामध्ये नुकसान दाखविण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे तसेच काही शेतकऱ्यांकडुन संबधीताकडुन आर्थिक देवाण घेवाण करण्याची मागणी केल्याचे दिसुन येत आहे. यासंबंधी विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत आहे तसेच शेताच्या पंचनामा संबधी, शेतीच्या इतर कामासंबंधी फोन केल्यास फोन घेत नाहीत शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर विविध लाभ देण्यासंबंधी अनुदान मंजुर असुनही अशा अधिकार्यांमुळे खरे लाभार्थी असलेले शेतकरी यापासून वंचित राहत आहेत, प्रत्यक्षात मोठया प्रमाणावर नुकसान झालेले असतांना कमी प्रमाणावर नुकसान झाल्याचे दाखविण्यात येत आहे. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्यचे जालना जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत देण्यात आले, यावेळी अनिरुद्ध साबळे यांनी मुजोर अधिकारी यांच्याकडुन शेतकऱ्यांना होणारा त्रास तात्काळ बंद करण्यात यावा व दिपावळी आगोदर बाधित शेतकरी यांना शासनाच्या अनुदानाचा लाभ देण्यात यावा. यासंबंधी आपणाकडुन कार्यवाही न झाल्यास आपले कार्यालयासमोर आम्ही सर्व शेतकरी व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य, जालना यांच्याकडुन तिव्र आंदोलन करण्यात येईल. यामध्ये आमच्या कुणाच्याही जीवीतास होणाऱ्या हानीची जबाबदारी आपणावर असेल, असा इशारा देखील तहसीलदार यांना दिला.
