मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यातील मौजे राजेगांव येथील बाळु आसाराम थोरात जात मांग दिनांक ०४/०५/२०२५ रोजी रात्री ८.३० घनसावंगी येथून गावाकडे जात असताना गावालगत अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित वाहन चालक अज्ञात यांचा पोलीस यंत्रणे मार्फत शोध करून गुन्हा नोंद करून, पुढील कायदेशीर कार्यवाही करावी, जेणे करून अशी घटना पुन्हा घडणार नाही याची दक्षता स्वतः वाहन चालक घेतील. या अनुषंगाने मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे व मानवी हक्क अभियान जालना जिल्हा उपाध्यक्ष आंबादास जाधव यांनी मयत बाळू थोरात यांच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन करुन मानवी हक्क अभियान संघटना पुर्णपणे आपल्या सोबत आहे.
