जळगाव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “सामाजिक समता सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे अभिवादन कार्यक्रम व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात “कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची नवी लाट” या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून “मानवी हक्कांचे प्रतीक चवदार तळे सत्याग्रह” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मान्यवर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना शासकीय/निमशासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश वितरित करण्यात येणार आहेत. विविध शासकीय योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वाटपही केले जाणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास विभागाचे पुरस्कार्थी, सबळीकरण योजनेचे लाभार्थी तसेच जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!